शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा गाठ मनसेशी

वीज वितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी मागील 1 ते दीड महिन्या पासून वीज पुरवठा खंडित केला होता तो पूर्ववत करावा या मागणीसाठी पंढरपूर टेंभुर्णी रोडवर तब्बल पाच तास मनसे ,स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना यांच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, डी व्ही पी ग्रुप चे अभिजित पाटील, यांच्या नेत्रत्वाखाली रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले,, आम्ही वीज वीज बिल भरू पण वीज पुरवठा सुरळीत करा या मागणीवर वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी रोखून धरलेला रस्ता खुला केला.